
आपले उपक्रम

आपत्ती काळातील सामाजिक बांधिलकी
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्या वेळी अन्नधान्य, औषधे, कपडे यांसारख्या आवश्यक वस्तूंची मदत पुरवून सामाजिक बांधिलकी जपली.

महापूरग्रस्त जनतेसाठी तातडीची मदत
कोल्हापूर-सांगलीतील महापुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बोटींची व्यवस्था केली आणि हजारो नागरिकांसाठी अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करण्यात आली.

कोरोनाच्या काळातील मदतीचे कार्य
कोरोना काळात मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा, मास्क, सॅनिटायझर आणि अन्नधान्य पुरवण्यात मदत केली. शेकडो रुग्णांसाठी ऑक्सिजनसह बेड उपलब्ध करून दिले.

ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत
भूस्खलनामुळे ईर्शाळवाडी गाव जमीनदोस्त झाले असताना, बचाव कार्यात स्वतः सहभागी होत माणुसकीचे नाते जपत मदतीचा हात दिला. वाढदिवसाच्या दिवशीही बचाव कार्यात स्वतःला झोकून दिले.

कामगार संपावर तातडीची मध्यस्थी
प्रदीर्घ कामगार संपामुळे बंद पडलेला दौलत साखर कारखाना, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने केवळ एका दिवसात पुन्हा सुरू करण्यात आला. कामगार, शेतकरी आणि व्यवस्थापक यांच्यात समन्वय साधून शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टाळण्यात यश मिळाले.